VishwaRaj

सांधे प्रत्यारोपण कायमस्वरूपी चे असते का?

सांधे प्रत्यारोपण हे कायमस्वरूपी टिकत नाही. अखेरीस, त्याची झीज होते कारण ते प्लास्टिकचे किंवा धातूचे बनलेले असते. या पदार्थांना सहसा दीर्घ आयुष्य नसते. तुम्ही तुमच्या कारचे टायर बदलता, आणि काही ठराविक वेळे नंतर त्याचा रबर फाटतो, हे अगदी त्याच्यासारखे आहे. तथापि, प्रत्यारोपण हे अपेक्षे पेक्षा बऱ्याच अधिक कालावधी साठी व्यवस्थित राहते. गुडघा आणि हीप हे सर्वात व्यापकपणे प्रत्यारोपण केले जाणारे सांधे आहेत.

वर्षामध्ये जवळपास 2.6 लाख एवढ्या प्रमाणामध्ये गुडघा आणि हीप या सांध्यांचे प्रत्यारोपण केले जाते. हे प्रत्यारोपण बऱ्याच कालावधी साठी टिकून राहते असे दिसून आले आहे. परंतु प्रत्येकाला किती कालावधी पर्यंत आराम टिकून राहील याचा अंदाज हवा असतो. सांधे प्रत्यारोपण हे अशा प्रकारचे काहीच नाहीये जिथे म्हणावे लागेल की आम्हाला धोका पत्करायचा आहे.

🔹 सर्वेक्षण काय दाखवते:
जगामधील विवीध भागां मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या मदतीने नुसार, सांधे प्रत्यारोपणाची बरीच सर्वेक्षणे ही 20 वर्षां पेक्षा जास्त कालावधी पर्यंत चालू राहिली. संशोधकांना अभ्यासाअंती असे निदर्शनास आले की, ज्या सांध्यांचे प्रत्यारोपण केले आहे त्यांची हालचाल वीस वर्षांनंतर देखील अगदी सहजपणे होत होती. तथापि, सांध्याचे कार्य हे काही दशके व्यवस्थित पणे चालावे हे साध्य करण्याचे ध्येय आहे.

परंतु वरील माहिती मध्ये तफावत ही की जिथे काही रुग्णांना काही दशके व्यवस्थितपणे कार्याचा अनुभव आला तिथेच काही रुग्णांना खराब अनुभव देखील आला. लोकांना सांधे प्रत्यारोपणाच्या काही वर्षां नंतर त्या प्रक्रियेच्या रिव्हिजन चा विचार करावा लागला. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिये ची रिव्हिजन म्हणजे दुसऱ्या वेळेस सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे होय. सांधे प्रत्यारोपणा चा दीर्घकालीन परिणाम सुधारण्यासाठी, बरेच इम्प्लांट उत्पादक हे सर्वोत्तम इम्प्लांट तयार करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. इम्प्लांट्स हे दीर्घ कालावधी साठी टीकतात किंवा नाही हे तपासण्या साठी साधारणपणे ते खूप कमी वेळा वापरले जातात.

🔹 कालावधी वर परिणाम करणारे घटक :

सांधे प्रत्यारोपणाच्या दीर्घायुष्या संबंधी जवळपास शंभर विश्लेषणे तिथे आहेत. विशिष्ट व्यक्ती साठी टिकेल असा, आराम मिळवण्याचा कोणताही विशिष्ट नियम नाही. तथापि, दीर्घायुष्या वर काही प्रमाणामध्ये काही घटक परिणाम करू शकतात.

▪️ रुग्णाचे वय :
तरुण रुग्णांमध्ये सांधे प्रत्यारोपणा चा शेवट होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे, जर वयाच्या 50 व्या वर्षापूर्वी तुम्ही सांधे प्रत्यारोपण करत असाल, तर तुम्हाला रिव्हिजन ची आवश्यकता असते. या परिणामा चे कारण असे की तरुण लोक हे अतिशय अॅक्टिव असतात आणि जास्त शारीरिक हालचालींच्या कामामध्ये व्यस्त असतात.

▪️ रुग्णाचे वजन:
जर तुम्ही लठ्ठ असाल तर, तुमच्या शरीराचा संपूर्ण भार हा सांध्यांवर आलेला असतो. अशाप्रकारे, प्रत्यारोपण करण्यात आलेल्या सांध्यावर यामुळे ताण येऊ शकतो. त्यामुळे, स्वतःला दुसऱ्या प्रत्यारोपण प्रक्रियेपासून वाचवायचे असेल तर, तुम्हाला नियमितपणे व्यायाम करावा लागेल. आरोग्यपूर्ण शारीरिक हालचाली तुमच्या सांधे प्रत्यारोपणाचे आयुष्य वाढवू शकतात.

▪️ रुग्णाच्या शारीरिक हालचाली:
सांधे प्रत्यारोपण झाल्या नंतर काही शारीरिक हालचाली या शिफारस करण्याजोग्या नसतात. तरीदेखील, जर तुम्ही अशा प्रकारच्या हालचाली करत राहिलात तर, तुम्हाला त्याचे परिणाम एकाच वेळी दिसणार नाहीत परंतु ते अखेरीस तुमच्या सांधे प्रत्यारोपणाच्या झिजेस कारणीभूत ठरेल.

▪️ निष्कर्ष:
वर दिलेल्या माहितीकडे पाहिल्या नंतर सांधे प्रत्यारोपण हे अपेक्षे पेक्षा जास्त कालावधी साठी टिकून राहते याचे पुरावे मिळतात. त्यामुळे, त्याचे दीर्घायुष्य वाढवण्या साठी, तुम्हाला आरोग्यपूर्ण हालचाली आणि सक्रिय आयुष्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. हलके व्यायाम प्रकार, नियमितपणे सायकल चालवणे आणि इतर हालचाली या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात. मोठी शस्त्रक्रिया टाळण्यासाठी, आरोग्यपूर्ण रहाणे हे नेहमीच उत्तम असते. तथापि, सांधे प्रत्यारोपणा मधून जाण्यासाठी जर तुम्ही पुरेसे तंदुरुस्त असाल तर, ते मोठ्या प्रमाणा मध्ये वेदना कमी करू शकते.

संबंधित पोस्ट